पंढरीचा पांडुरंग म्हणजे बुद्धाचेच प्रतिक होय !!
विठ्ठलावर आज पर्यंत अनेकांनी पुस्तक व लेख लिहिले. सर्वानी आपआपल्या परीने विठ्ठलाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला.
आजही त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न संपलेला नाही. काही यशस्वी हि झाली असतील. आणि काही अपयशीही. तरी प्रत्येकाची काही ना काही मत आहेत. त्यांचा आधार घेत मी माझी मतं तयार केलेली आहेत. अर्थात सध्याच्या घडीला ती मी माझ्या पुरता अंतिम मानत असलो तरी नवीन माहिती समोर आल्यावर ती मी बदलूही शकतो.
रा.ची. ढेरे 'विठ्ठल : एक महासमन्वय' या पुस्तकात म्हणतात:-
"विठ्ठल या नावाचा स्पष्ट उलगडा अजून व्हायचा आहे. आणि कदाचित त्या उलगड्यातूनच विठ्ठलाच्या मुलरूपाचा शोध लागण्याचा संभव आहे......त्या आदिरूपाचा शोध घेण्यासाठी विठ्ठल नावाची निःशंक व्युत्पत्ती सापडायला हवी"
ह्याच विठ्ठल नामाच्या व्युत्पत्तीच्या शोधासाठी हा लेख मी लिहिलेला आहे.
महाराष्ट्राचं एकमेव प्रसिद्ध लोकदैवत म्हणजे विठ्ठल.
विठ्ठलाला विठू, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ या नावाने देखील ओळखलं जातं.
विठ्ठलाच्या नावाची व्युत्पत्ती काही मान्यवरांनी सांगितलेली आहे ती पुढील प्रमाणे :-
१. डॉ. रा. गो. भांडारकर यांनी 'विष्णु' या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ' बिट्टी' असे होते. व बिट्टी वरून विठ्ठल हे रूप तयार झाले असे म्हटले आहे.
२ वि. का. राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द ' विष्ठल ' म्हणजे दूर रानावनातील जागा यातून निष्पादावा असे म्हटलेले आहे.
३ विश्वनाथ खैरे यांनी 'इटु' शब्दाचा तामिळ अर्थ ' कमरेवर ज्याने हात ठेवले तो' असा अर्थ सांगितला आहे.
४ डॉ. रा. चि. ढेरे यांच्या मते धनगरांच्या इटल-ब्रमल या जोडदेवांपैकी एक असलेल्या इटलाच विठ्ठल रूप झाले असावे अस त्यांच म्हणणे आहे.
५ विटेवर उभा म्हणून विठ्ठल अशीही एक व्युत्पत्ती सांगण्यात येते.
या सर्वांमध्ये वि. का. राजवाडेनी केलेली विठ्ठल नावाची व्युत्पत्ती बरीच जवळ जाताना दिसते. याची चर्चा आपण पुढे करणार आहोत.
पांडुरंग या नावामुळे विठ्ठलाच बौद्ध रूप ध्यानी येत. अस अनेक विद्वानांच मत आहे.
आजही त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न संपलेला नाही. काही यशस्वी हि झाली असतील. आणि काही अपयशीही. तरी प्रत्येकाची काही ना काही मत आहेत. त्यांचा आधार घेत मी माझी मतं तयार केलेली आहेत. अर्थात सध्याच्या घडीला ती मी माझ्या पुरता अंतिम मानत असलो तरी नवीन माहिती समोर आल्यावर ती मी बदलूही शकतो.
रा.ची. ढेरे 'विठ्ठल : एक महासमन्वय' या पुस्तकात म्हणतात:-
"विठ्ठल या नावाचा स्पष्ट उलगडा अजून व्हायचा आहे. आणि कदाचित त्या उलगड्यातूनच विठ्ठलाच्या मुलरूपाचा शोध लागण्याचा संभव आहे......त्या आदिरूपाचा शोध घेण्यासाठी विठ्ठल नावाची निःशंक व्युत्पत्ती सापडायला हवी"
ह्याच विठ्ठल नामाच्या व्युत्पत्तीच्या शोधासाठी हा लेख मी लिहिलेला आहे.
महाराष्ट्राचं एकमेव प्रसिद्ध लोकदैवत म्हणजे विठ्ठल.
विठ्ठलाला विठू, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ या नावाने देखील ओळखलं जातं.
विठ्ठलाच्या नावाची व्युत्पत्ती काही मान्यवरांनी सांगितलेली आहे ती पुढील प्रमाणे :-
१. डॉ. रा. गो. भांडारकर यांनी 'विष्णु' या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ' बिट्टी' असे होते. व बिट्टी वरून विठ्ठल हे रूप तयार झाले असे म्हटले आहे.
२ वि. का. राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द ' विष्ठल ' म्हणजे दूर रानावनातील जागा यातून निष्पादावा असे म्हटलेले आहे.
३ विश्वनाथ खैरे यांनी 'इटु' शब्दाचा तामिळ अर्थ ' कमरेवर ज्याने हात ठेवले तो' असा अर्थ सांगितला आहे.
४ डॉ. रा. चि. ढेरे यांच्या मते धनगरांच्या इटल-ब्रमल या जोडदेवांपैकी एक असलेल्या इटलाच विठ्ठल रूप झाले असावे अस त्यांच म्हणणे आहे.
५ विटेवर उभा म्हणून विठ्ठल अशीही एक व्युत्पत्ती सांगण्यात येते.
या सर्वांमध्ये वि. का. राजवाडेनी केलेली विठ्ठल नावाची व्युत्पत्ती बरीच जवळ जाताना दिसते. याची चर्चा आपण पुढे करणार आहोत.
पांडुरंग या नावामुळे विठ्ठलाच बौद्ध रूप ध्यानी येत. अस अनेक विद्वानांच मत आहे.
याबाबत डॉ. आंबेडकर म्हणतात - विठोबाचे ' पांडुरंग ' हे नाव पुंडरिक या शब्दापासून बनलेले आहे. पुंडरिक म्हणजे कमळ आणि कामळालाच पालीमध्ये पांडुरंग म्हणतात. म्हणजे पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच होय ( डॉ. आंबेडकर चरित्र, कीर, पृ. ५०१)
'सद्धर्म पुंडरिक' हा महायान पंथाचा प्रमुख ग्रंथ आहे.
इंडियन अँटिक्वेरी (भाग दहावा) मध्येही पंढरपूर हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते आता हिंदूंचे झाले असा उल्लेख आहे.
( श्री विठ्ठल आणि पंढरपूर, लेखक - ग. ह. खरे, पृ. १४९)
बौद्धपूर्व या ग्रंथाचे लेखक श्री. वा. गो. आपटे यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. (पृ. १६७)
वारकरी पंथाचा भगवा झेंडा जो मराठा राज्याने स्वीकारला तो बुद्धाचाच होय. भगवा रंग हा भिक्षुचा वस्त्राचा रंग आहे. भगवान हे बुद्धाचेच नाव आहे.
(पुराणकथा आणि वास्तवता, लेखक दामोदर धर्मानंद कोसंबी, पृ. ४१)
अशोकाने बुद्धाची ८४ हजार देवळे बांधली त्यापैकी हे एक मंदिर असावे. सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या memoior of the cave temple या ग्रंथात मंदिर बौद्ध असल्याचे म्हटले आहे.
(धर्मपद, अ. रा. कुलकर्णी, या ग्रंथाचे परिशिष्ट पहा)
या मान्यवरांच्या मतानुसार विठ्ठल हा बौद्ध धर्माशी संबंधीत असावा हि खात्री पटते.
संतांनी सुद्धा विठ्ठलाला बौद्धरूपात पाहिलेलं आहे :-
होऊनिया कृष्ण कंस वधियेला ।
आता बुद्ध झाला सखा माझा ।।- संत जनाबाई
(३४४)
बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून ।
पुंडलिक दिवटा पाहून । तयाचे द्वारी गोंधळ मांडीला ।।बया दार लाव ।। बौद्धाई बया दार लाव ।।- संत एकनाथ
(३९११)
गोकुळी अवतारु सोळा सहस्त्रांवरू ।
आपण योगेश्वरु बौद्धरूपी ।।
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
झाला दिगंबर अवनिये ।।- संत नामदेव
(१०९६)
बौद्ध अवतार माझिया अद्रुष्टा । मौन्य मुखे निष्ठा धरीयेली - संत तुकाराम
मध्ये झाले मौन देव निजध्यानी । बौद्ध ते म्हणोनी नावेरूप - संत नामदेव
(२१०५)
अश्या प्रकारे संतानी विठ्ठलाला मौनी बुद्ध म्हणून पाहिलेलं आहे हे आपल्या समोर आहे.
आता आपण विठ्ठल संबंधाने काही भौतिक पुरावे व काही चालीरीती पाहू.
१ पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.
२ जुन्या काळी दशावताराची चित्रं छापताना नवव्या अवताराच्या ठिकाणी बुद्धा ऐवजी विठ्ठलाचे चित्र असे डॉ. रा चि. ढेरे यांनी नोंदवून ठेवले आहे.
३ दरवर्षी आषाढ पौर्णिमेला पंढरपूरची महायात्रा भरते. या पौर्णिमेला बौद्ध वाङमयात फार महत्वाचे स्थान आहे.
४ वारकरी ( मूळ शब्द वारीकरी) या संप्रदायात प्रवेश करते वेळी शपथ घ्यावी लागते. ही शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील होय.
५ चातुर्मासात वारी हि हिंदू संस्कृती प्रमाणे अयोग्य होय.
६ विठ्ठल पीतांबर धारी आहे. पीतांबर म्हणजे चिवर. बुद्ध जसे चीवर धारण करतात तेच चिवर विठ्ठलाला नेसवतात ज्याला पीतांबर म्हणतात.
७ पंढरपूरच्या वारीला निदान पंढरपूर पुरता तरी स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून सर्व एकत्र गोळा होतात.
८ बहिनाबाईंनी संत तुकाराम महाराज व विठ्ठलाच्या प्रेरणेतूनच बौद्ध महाकवी अश्वघोषाच्या वज्रसूची या चातुर्वर्ण्यविरोधी ग्रंथाचा मराठी अनुवाद केला.
या परंपरामधून व भौतिक पुराव्यातूनही विठ्ठल बौद्ध धर्माशी संबंधित असावा असा निष्कर्ष निघतो
विदा ज्ञानेन ठान शुन्यान लाति ग्रुव्हतिच स्वायम ।
तस्मात विठ्ठल म नामत्व, ध्यायस्व मुनिश्वर ।।
विठ्ठल हा शून्य तत्वज्ञान ग्रहण करून आपल्या ज्ञानाने इतरांच अज्ञान दूर करणारा आहे
शून्य तत्वज्ञान हे महायान पंथाचा प्रवर्तक नागार्जुनाने बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद यालाच पर्याय समजून घेतले आहे.
तोचि बौद्धरूपे जाण । पुढा धरिल दृढ मौन ।
तेव्हा कर्माकर्म विवंचना । सर्वथा जाण कळेना ।
तो तटस्थपणे सदा । प्रवर्तील महावादा ।
इतर दृष्टीकोनातून विठ्ठलाचे स्वरूप थोडक्यात पाहूया.
काही मान्यवरांनी विठ्ठल प्रमुख देव नसून पुंडरीकच (शिव)प्रमुख दैवत असून विठ्ठल हा शिवभक्त आहे असे म्हटलेले आहे.
पुंडरिक हा शिव आहे. हे कळावं म्हणून त्यांनी काही घटक आपणासमोर ठेवलेली आहेत.
१ पुंडरिक मंदिरात भव्य शिवलिंग आहे. पुंडरिकाची कसलीही मूर्ती नाही.
२ पुंडरिक मंदिरा बाहेर आता विस्थापित असला तरीही एक नंदी आहे.
३ पुंडरिक लिंगाची पूजा शिवाप्रमाणे बेल फुल वाहून होते.
४ महाशिवरात्रीस येथे माघ वद्य दशमी पासून पाच दिवस उत्सव होतो.
(विठ्ठलाचा नवा शोध - संजय सोनवणी)
हे पुरावे पुंडरिक शिव होता. यासाठी प्रबळ आहेत. परंतु विठ्ठलाच काय ?
तो हि शिवभक्तच होता काय ?
लगेचच असा निष्कर्ष काढन चुकीचं होईल. इतिहास काय सांगतो ते आधी आपण पाहूया
आद्य शंकराचार्यानी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भेट दिली होती असा उल्लेख 'चिदविलासयती' च्या शंकरविजयात आहे.
आचार्य दर्शनाला गेले आणि त्यांच्या तोंडून उदगार निघाले:-
महायोगपीठे तटे भिमरथ्या वरं पुंडरिका दातृ मुनींद्रे: ।
समात्याग तिष्ठता मानंदकंद परब्रह्म लिंग भजे पांडुरंगम ।।
शंकराचार्य यांचा इतिहास आपण पाहिला तर बौद्ध धर्माच्या विरूद्ध त्यांनी आपल तत्वज्ञान निर्माण केलं व बौद्धांच्या विरोधात जीवन वाहून घेतलं होत.
जगन्नाथ पुरी च्या संदर्भात माहिती देताना एल. एम. जोशी म्हणतात :-
आद्य शंकराचार्य द्वारे स्थापित केंद्रांपैकी एक ओरिसातील पुरी येथे होते.स्वामी विवेकानंद जे शंकर संप्रदायाचे अर्वाचीन काळातील प्रमुख शिक्षक आहेत त्याच्या अनुसार ' जगन्नाथाचे मंदिर एक जुने बौद्ध मंदिर आहे , त्याला आणि तशाच काही अन्य मंदिरांना आम्ही घेऊन त्यांना हिंदू मंदिर बनवून टाकले. पुढे सुद्धा आम्हाला अशा प्रकारची अनेक कामे करावयाची आहेत. ( श्री. एल. एम. जोशी पृ. ५१ - १९७७)
बदरीनाथ बद्दल श्री. दवे आणि एल. एम. जोशी यांच्या ग्रंथाचा दाखला देत डॉ. के. जमनादास यांनी आपल्या ग्रंथात नमूद केले आहे की परंपरेनुसार इ.स. ८-९ व्या शतकात आदय शंकराचार्याद्वारे बद्रीनारायनाच्या मंदिराचे निर्माण झाले. त्यांनी नारद कुंडात खोल डुबकी मारून तेथून हरवलेली मूर्ती काढून स्थापित केली. व इथे चार प्रमुख मठापैकी एकाची स्थापना केली.ज्याला उत्तरान्मय ज्योतिर्मठ म्हटल्या जाते.
या विषयी लालमणी जोशी आवर्जून सांगतात की ही मूर्ती बुद्धाची आहे
" बौद्धाची अन्य अनेक मंदिर ज्यांनी हिंदूंनी घेतली. त्यामध्ये उल्लेखनीय आहे गढवाल येथील बद्रीनाथाच मंदिर तेथे आज सुद्धा पूर्वीचीच आद्य बुद्धमूर्ती आपल्या स्थानी स्थित आहे आणि विष्णू म्हणून पूजल्या जात आहे. (श्री. एल. एम. जोशी, पृ. ५१ : १९७७)
सारनाथ स्तूपाजवळ आजही त्याची मान्यता आहे की स्तूपाचं शिवलिंग करण्याचं काम शंकराचार्यानी केलं.
(हिंदी संस्कृती आणि अहिंसा - कोसंबी)
बौद्धांच्या मुरत्यांची नासधूस करून त्याला शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला.
(देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे - प्रबोधनकार ठाकरे)
बुद्धाच्या विहाराशेजारीच ब्राह्मणांनी आपली विहारे बांधण्यास सुरवात केली......परकीय आक्रमणामुळे बुद्धभिक्खू देश सोडून गेले. त्यांच्या गैरहजेरीत ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा समूळ लोप करण्याच्या उद्देशाने बुध्द विहाराना पांडव लेणी म्हणू लागले. व बुद्धाच्या मूर्ती फोडून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू लागले.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-२०, पृ.३३४)
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आधी बौद्ध धर्माचे व नंतर शैव धर्माचे ठाणे होते
(कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे)
पुष्यमित्र शुंगाने कपटाने बृहद्रथाचा खून केला. सत्ता हस्तगत केल्यानंतर त्याने बौद्ध भिक्खुंचा छळ केला, हत्या केल्या.
बुद्धगया हे हे बौद्ध धर्मियांचे एक अत्यंत पवित्र स्थान आहे. त्याला बौद्धांची काशी म्हणतात. येथे बुद्धाची एक भली जंगी मूर्ती होती. ती काढून पुष्यामित्राने तिच्या जागी शिवाची मूर्ती स्थापन केली. (अशोक चरित्र - वा. गो. आपटे)
अशी इतिहासातील अनेक उदाहरणे आपणाला देता येतील.
रा.ची.ढेरे आपल्या विठ्ठल : एक महासमन्वय या ग्रंथात म्हणतात :-
"विठ्ठलाच्या उन्नयन प्रक्रियेत प्रथम शैवीकरणाची अवस्था सर्वत्र येते आणि नंतरच वैष्णविकरणाची अवस्था येते. असे सिद्ध होऊ शकत नाही.हि उन्नयन प्रक्रिया एकरेशीय नाही. तर बहुरेशिय आहे. उन्नयन प्रक्रियेत सापडलेल्या विठ्ठल-बिराप्पाच्या प्रत्येक ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारे उन्नयन घडत राहिले आहे. हे सत्य केवळ विठ्ठल बिराप्पापुरतेच मर्यादित नाही, तर मुरुगन -अय्यपन -अय्यनार यांसारख्या दक्षिणेतील लोकदेवांच्या ठाण्यात अथवा लज्जागौरीसारख्या आदिम मातृदेवीच्या ठाण्यातही आपणास उन्नयनप्रक्रिये संबंधीच्या या सत्याचा स्पष्ट प्रत्येय घेता येतो"
माणिकराव धनपलवार म्हणतात:-
"विठ्ठलाचे जसे वैष्णवीकरण घडले तसे त्याचे शैविकरण हि घडले होते; शैविकरणाची प्रक्रिया हि वैष्णविकरणाच्या पूर्वी पार पडली होती."
रा.ची ढेरे यांच्या मते विठ्ठल व त्यासारख्या इतर दैवतांचे शैवीकरण व वैष्णवीकरन झालेले आहे पण नेमकं आधी काय झालं व नंतर काय झालं हे सांगता येत नाही. व माणिकराव धनपलवार यांच्या मते विठ्ठलाचे वैष्णवीकरणाआगोदर शैवीकरन झालेलं आहे.
बौद्ध विहाराच्या जागा (आर्य)हिंदूंनी बळकावल्या. व त्याचे हिंदू मंदिरात रूपांतर केलं गेलं. (उदा: लेण्याद्री) आजही हि क्रिया थांबलेली नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो संख्येनं हिंदू भाविक बौद्ध लेण्यातील चैत्य स्तूपाना शिवलिंग म्हणून पुजताना दिसतील. काही ठिकाणी तर नारळ फोडून चैत्य स्तूपाना नुकसान पोहचवण्याच काम हि भाविक मंडळी करताना दिसतात. अश्या प्रकारे आजही बौद्ध लेण्यांचे हिंदुकरण करण्यात येत आहे.
पण सध्या जागरूक असणाऱ्या काही बौद्ध अनुयायांमुळे हे प्रमाण कमी होताना दिसत आहे.
जगन्नाथ हे बौद्ध मंदिर होते हे अनेक विद्वानांनी सिद्ध केले आहे. जगन्नाथाला मौनी बुद्ध मानण्याची परंपरा आहे तसेच विठ्ठलाला देखील मौनी बुद्ध मानण्याची परंपरा आहे.
स्कंद पुराणात पुंडरिकाशी संबंधित कथा आलेली असून त्याचा संबंध जगन्नाथ पुरीशी आलेला आहे.
पुंडरिकाचा उल्लेख आगोदरच्या साहित्यात फार कमी वेळा उल्लेखलेला आहे.
पांडुरंग व पुंडरिक हे नावदेखील एकसारखंच ( पुंडरीक च पांडुरंग झालेलं आहे ) आहे.
पुंडरीक दुसर तिसरं काही नसून शिवलिंग आहे. हे पण आपण पाहिलं.
याचा अर्थ मूळ विठ्ठलाची कीर्ती कमी करण्याच्या हेतूने विठ्ठलाच्या नावेच तिथे शिवलिंग मुख्य देव म्हणून उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला ?
श्री. म. माटे हे आपल्या 'पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रूपांतर' या लेखात काय म्हणतात ते पाहूया.
" दुसरी गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. पुंडलिकाच्या देवळात पुंडलिकाची मूर्ती नाही. तेथे शिवाचे लिंग आहे; आणि लिंगावर पुजारी लोक पितळेचा मुखवटा घालतात. जर ती पांडुरंगाची समाधी आहे, तर पद्धती प्रमाणे पादुका बसवावयास हव्या होत्या. आणि त्या बसवलेल्या असत्या, म्हणजे पुजार्यानी पितळेचा मुखवटा बसवला असता असे वाटत नाही. तथापी समाधीवर महादेवाचे लिंग बसवण्याची चालही आहे. आणि पुंडलिकाची समाधी ज्यांनी बांधली, त्यांनी कल्पनेप्रमाणे शिवलिंगाची स्थापना केली असेल. पण या ठिकाणी एक विकल्प मनात येतो. या पुंडलिकाच्या देवळातले पुजारी कोळी आहेत. अनेक ठिकाणी महादेवाची पुजा कोळ्यांकडेच असते. पूजेचा पहिला मान कोळ्यांकडे किंवा जंगमांकडे असून त्यांच्यामागून ब्राह्मणांनी पूजा करावी अशी चाल असते पण हि चाल एखाद्या समाधीवर बसवलेल्या शिवलिंगाच्या बाबतीत नसावी, असे मला वाटते. मग येथे पुंडलिकाची समाधी आहे, आणि हे मूळचेच महादेवाचे स्थान नाही तर येथली पूजा कोळ्यांकडे कशी, या प्रश्नाचाहि शोध करावा लागेल"
येथे श्री. म. माटे यांच्या मते पुंडरीक मंदिरात शिवलिंग आहे. त्याला पितळी मुखवटा बसवलेला आहे. ते शिव मंदिर असण्याचीही शक्यता आहे. पण त्याच बरोबर ती समाधी असण्याची शक्यता दर्शवून समाधीवर लिंग उभारण्याची प्रथा आहे असेही ते सांगतात. पण त्यांच्या मनात एक शंका आहे ती म्हणजे अन्य महादेव मंदिरात प्रथम पुजेचा मान कोळी किंवा जंगम यांना असतो नंतर ब्राहमण पुजारी तेथे पूजा करतो. मग पुंडरीक मंदिरातील पुजारी कोळी कसे हा त्यांचा प्रश्न आहे.
याच उत्तर त्यांनी पुंडलिक लिंगा ऐवजी आगोदर तेथे पुंडलिकाची मूर्ती असावी व नंतर तेथे लिंगाची स्थापना केली असावी असे मत त्यांनी मांडलेलं आहे
रा.ची ढेरे यांनी मात्र त्यांच पहिले मत उद्धृक्त करून पुंडरीक हा लिंग स्वरूपातील शिव आहे असे मानतात.
त्याला कारण म्हणजे त्यांच्याही मनात तोच प्रश्न आहे पुंडरीक मंदिरातील पूजारी कोळी कसे ?
आणि हा प्रश्न स्वाभाविक आहे. त्याच उत्तर असे कि पुंडरीक हा स्वतः कोळी समाजातील प्रसिद्ध व्यक्ती होती. याचे दाखले लीळाचरित्र व धनगरी कथेत आलेले आहेत. लिलाचरित्रात स्पष्टपणे विठठलाचा आणि कोळी समाजातील एका व्यक्तीचा संबंध आलेला असून धनगरी साहित्यातील म्हालिंगराय ह्या विठ्ठल भक्तांचा संबंध असून कोळी समाजातील व्यक्तीच समजली जाते.
अस जर असेल तर पुंडरिकाची पूजा कोळी लोकांनी करणं स्वाभाविकच आहे. पुंडरीक ज्याला म्हटलं जात तो कोळी समाजातील विठ्ठलाचा परम भक्त आहे. त्याच्या मृत्यूनंतर आदिम पद्धतीप्रमाणे त्यावर लिंग उभारणं हे हि स्वाभाविकच आहे ( लिंगपूजेचा संबंध प्रथम शिवपूजेशी नव्हता नंतर तो जोडण्यात आला हे वेगळ्या लेखात सविस्तर लिहीन)
लीळाचरित्र व श्री.म. माटे यांनी 'पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रूपांतर' हा लेख वाचल्यावर हे कळेल कि आज जो पुंडरीक म्हणून ओळखला जातो ती एका कोळी समाजातील व्यक्तीची समाधी आहे. लिळाचारित्रात विठठलाबरोबर त्या कोळी व्यक्तीचा देखील संदर्भ आलेला आहे. आदिम समाजात समाधीवर पिंड उभारण्याची प्रथा असून ती प्रथा काही समाजात आजही टिकून आहे. त्याचप्रकारे ती बांधलेली असून त्याचे पुजारी कोळी आहेत. या समाधीचा आणि विठ्ठलाचा संबंध नंतर जोडला गेलेला आहे ? कि खरच तो विठ्ठल भक्त आहे ?
तो भक्तच आहे व ती समाधीच आहे अशी संत परंपरा मानते व ते योग्य आहे. पण शैविकरण करताना पुंडरिकाला शिव बनवण्याचा प्रयत्न झाला. जसा मल्लीकार्जुन या जवळच्याच स्थानाचा झाला. बारा जोतिर्लिंगातील मल्लिकार्जुन हा मल्लाचं मूळ होय असे श्री. चांदोरकरांनी म्हटलेलं आहे.
मल्लीकार्जुन या नावात अर्जुन असणं आणि विठ्ठलाला कृष्ण म्हणन हि गोष्ट या दोघांना गुरू शिष्य असल्याचे तर निदर्शक नाही ना ?
इटल-ब्रमल या जोडदेवांपैकी विठ्ठल हा इटल आहे. तर ब्रमल हा विरमल्ल आहे असे रा.ची. ढेरे म्हणतात
त्याच बरोबर ते असेही म्हणतात कि इटल हा कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत विरमल्ल असतोच असतो. पण पंढरीतला विरमल्ल कोण हे ते सांगत नाहीत.
तो विरमल्ल मल्लिकार्जुनच आहे. त्याचेही आधी शैवीकरण करून त्याला शिव बनवले गेले.
या मल्लिकार्जुनालाच मल्लिनाथ म्हटलं गेलेलं आहे. खंडोबाला देखील मल्लिनाथ म्हटलं गेलेलं आहे. कदाचित खंडोबा देखील विरमल्ल तर नाही ?
विरमल्ला ला अर्जुन म्हणणं हे तो राजा असण्याशी संबंधित असून विठ्ठलाला कृष्ण म्हणनं हे त्याच्या गुरुत्वा कडे निर्देश करणारे आहे.
विठ्ठलाला लीळाचरित्र व अन्य पुराण कथा ब्राह्मण म्हणतात. श्रमणांना ब्राह्मण बनवण्याची परंपरा वैदिकांमध्ये पूर्वीपासूनच आहे. विठ्ठल हा श्रमण असण्याची शक्यताच अधिक आहे.
पुंडरीकमल्लिकार्जुनाच्या अग्र दर्शनाचा मान असण्याचं कारण हे दोनीही भक्त विठ्ठलाशी संबंधित लोकप्रिय भक्त होते.
रखुमाईची मूर्ती विठ्ठलापेक्षा दूर अंतरावर आहे हेही विठ्ठल श्रमण असण्याचं निदर्शक आहे. रखुमाई हि काल्पनिक आहे असं माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. धनगरी गीतात रखुमाईचा मृत्यू झाल्याचे वर्णन आहे. अस जर असेल तर विठ्ठलाने सन्यास घेऊन श्रमण बनला असण्याचीही शक्यता आहे. आणि म्हणून विठठलाबरोबर राखुमाईची मूर्ती अंतरावर ठेवण हे त्यावेळी लोकांना योग्य वाटलं असावं. विठठलाला लिळाचरित्राने व अन्य पुराण कथानी ब्राह्मण का म्हटले असेल त्याचा अर्थ असा आहे.
विठ्ठलाचा काळ :-
श्री.रघुनाथ भास्कर गोडबोले हे 'भरतखंडाचा अर्वाचीन कोश' या ग्रंथात लिहितात
" पुंडरीक हा जातीचा ब्राह्मण होता व मोठा विद्वानही असे. जैन लोक असे म्हणतात कि युधिष्ठिर शक १७२४ मध्ये विद्यारत्नाकर नावाच्या एका जैन पंडिताशी याचा वाद होऊन याचा पराभव झाला. व हा जैन धर्म स्वीकारून अहिंसा धर्माप्रमाणे आचरण करू लागला. हा वाद भिमारथीच्या तीरी म्हणजे भीमा नदीच्या काठी असणाऱ्या लोहदंड क्षेत्रात झाला. व त्यावेळी चंद्रगुप्तांचा मुलगा व अशोक राजाचा बाप वारीसार याची राज्यकीर्ती होती"
जैन लोक मल्लिकार्जुन व खंडोबाला मल्लिनाथ म्हणून ओळखतात. खरंतर जैनांच्या मल्लिनाथचा काळ व विठोबा आणि खंडोबाचा काळ यात फार तफावत आहे. फक्त नाम साधरम्यामुळेच ते खंडोबाला किंवा मल्लिकार्जुनाला जैनांचा मल्लिनाथ मानतात. मल्लिकार्जुन व खंडोबा हे मल्लिनाथ आहेत पण जैन लोक जो मल्लिनाथ मानतात तो मल्लिनाथ हे नाहीत.
श्री. गोडबोले यांच्या मतानुसार युधिष्ठाराचा राज्याभिषेक होऊन १७२४ वर्षांनी हि घटना घडलेली आहे.
श्री. काणे आणि श्री. अय्यर यांच्या मते महाभारताचा काळ इ.स.पु. १२०० हा आहे. मग हि तारीख खरी असेल तर पुंडरिकाचा काळ इ.स ५०० ठरतो. चंद्रगुप्त व अशोक हे मौर्य काळातील चंद्रगुप्त अशोक नसून गुप्त काळातील चंद्रगुप्त व अशोक आहेत (चंद्रगुप्त चा मुलगा समुद्रगुप्त हा स्वतःला अशोक म्हणवून घेत होता अस काही अभ्यासकांच मत आहे. ह्या काळातील मल्ल लोकांचा इतिहास शोधला तर सर्व माहिती मिळण्याची शक्यता आहे)
श्री. त्र्यं. गं. धनेश्वर यांनी 'वेरूळची लेणी' या पुस्तकात खंडेराव हि इ.स. ६२० मध्ये होऊन गेलेली एक बौद्ध विरोधक एक ऐतिहासिक व्यक्ती असावी असे म्हटलेले आहे.
श्री धनेश्वर यांच्या मतानुसार खंडोबाचा काळ इ.स. ६२० मानला आहे. जवळ-जवळ तोच काळ पुंडरिकाचा आहे हे श्री गोडबोले यांच्या दाखल्यावरून दिसून येते. धनेश्वरांनी खंडोबाला बौद्ध विरोधक व्यक्ती मानलेली आहे. खरंतर मिळणार्या पुराव्या वरून नेमकी परिस्थिती याच्या उलट दिसतेय.
विरमल्ल हा जर खंडोबा आहे व विरमल्लाचा आणि विठ्ठलाचा संबंध आहे. तर खंडोबा हा बौद्ध विरोधक व्यक्ती न ठरता बौद्ध समर्थकच ठरण्याची शक्यता आहे. जसा अशोक धनगर होता व बौद्ध होता. सातवाहनांना देखील काही लोक धनगर मानतात तेही बौद्ध धर्माबद्दल आदर दाखवत होते हे त्यांच्या काळातील बुद्ध लेण्यांवरून दिसून येईल तसेच धनगरांचा खंडोबा हा बौद्ध व्यक्ती नसली तरी बौद्ध विरोधक आहे याला कोणताही आधार दिसत नाही किंबहुना वरील विवेचनावरून ती बौद्ध समर्थक असावी अशीच शक्यता अधिक दिसते.
तिरुपती बालाजी हा विठोबाचं आहे. त्याच्याही परंपरा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. त्याला तिरुमल्ल म्हटलं जातं
पुराणात पांडुरंग माहात्म्य या नावाखाली वेगवेगळया कथा पसरवून सुरुवातीला इतर देवतांना पांडुरंग बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तोही फसला.
विठ्ठलाची कीर्ती ढळत नाही म्हटल्यावर विठ्ठलाच मूळ स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात विठ्ठलाच कृष्णकरण कऱण्यात आले व शिवाचा भक्त दाखवण्याचा प्रयत्न झाला.
कृष्ण भक्त असणारे महानुभाव यांच्या पवित्र ग्रंथात लिळाचारित्रात विठ्ठलाचे तुच्छतापूर्वक वर्णन आहे.
रामायणात राम भक्ताने बुद्धाला चोर म्हटले तश्याच प्रकारे लिळाचरित्रात कृष्ण भक्ताने विठ्ठलाला चोर म्हटले आहे.
स्कंद पांडुरंग महातम्यातील वर्णनानुसार
१ श्री. विठ्ठल बालाकृष्ण आहे.
२ श्री. विठ्ठलाच्या हृदयावर षडाक्षरी मंत्र कोरला आहे ( यांच्या कूट मंत्राचा अनुवाद रा. चि. ढेरे यांनी श्री.कृष्णाय नमः असा केला आहे)
३ श्री. विठ्ठलाच्या कपाळावर तृतीय नेत्र आहे
अशी लक्षणे असलेली मूर्ती माढे येथे स्थापित करण्यात आली. (पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर अशी कोणतीच लक्षण नाहीत) परंतु तिला पंढरपूर येथील विठ्ठला एवढ महत्व आलं नाही.
...सर्व आदित्यांमध्ये मी विष्णू आहे....मी रुद्रामध्ये शंकर आहे...(भगवदगीता)
सौप्तीक पर्वात महादेव अश्वत्थामा याला म्हणतात - कृष्णाने माझी पूजा केली. कृष्णाचा कार्योत्सव मोठा आहे. सत्य युद्धता प्रामाणिकपणा सहनशीलता चातुर्य स्वयंनियंत्रण हे श्री कृष्णाचे गुण आहेत. आता मला श्री कृष्णाहून प्रिय कोणी नाही.
उपन्याया कडून कृष्णाने शैव पंथाची दीक्षा घेतली
उपन्याया ब्राह्मणाने आठव्या दिवशी मला शास्त्रानुसार दीक्षा दिली. मी शीर्ष मुंडन केले. धृतमर्दन केले, हाती दंड घेऊन कुशमर्द घेऊन वल्कले धारण केली. कटीमेखला होतीच त्याने प्रायश्चित घेतले. मग त्याला महादेवाचे दर्शन घडले.
अनुशासन पर्वातील उतारा :-
पितामह ब्रह्मा पेक्षा हरी हा उच्च आहे. तो शाश्वत पुरुष आहे. तोच कृष्ण. सुवर्णकांती असलेला , मेघहीन आकाशात उगवलेला सूर्य , दश शस्त्रधारी , बलशाली , देवांच्या शत्रू चे नीरदालन करणारा , श्री वत्स लांछन असलेला तोच हा हृषीकेश देवाणीही ज्याची स्तुती करावी असा हा त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला मी ( शिव ) त्याच्या मास्तकातून निर्माण झालो.......
(हिंदुत्वाचे कोडे - डॉ. आंबेडकर)
अश्या प्रकारे कृष्ण शिवही आहे व विष्णूही. तो शिवभक्तं हि आहे. आणि शिवही त्याचा भक्त आहे.
शास्त्राचा आधार आधीच होता कींवा निर्माण केला गेला. याचा उपयोग विठ्ठलाला कृष्ण करण्यात व पुंडरीक लिंगाला तेथे स्थापना करण्यास हातभार लागला.
या सर्व गोष्टी करून सुद्धा विठ्ठलाच लोकांमधील स्थान त्यांना हलवता आलं नाही. त्याच स्थान तेच राहील जे आधी होत. त्याच्या स्वरूपा मध्ये बदल करण्यात मात्र (आर्य) हिंदू धर्मीय यशस्वी ठरले.
अतिवादी नव्हे शुद्ध या बिजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ।।
लेखाच्या सुरुवातीलाच विठ्ठल नावाची व्युत्पत्ती बघत असताना वि. का. राजवाडे यांनी दिलेली व्युत्पत्ती विठ्ठल नावाच्या सर्वात जवळ जाणारी आहे हे आधीच सांगितलेलं आहे.
पुन्हा एकदा त्यांनी दिलेली व्युत्पत्ती आपण पाहूया.
त्यांनी विठ्ठल हा विष्ठल म्हणजे दूर रानावनातील जागा यातून निष्पादावा असे म्हटलेलं आहे.
विष्टि + ठल (पाली शब्द) = विष्ठल (विठ्ठल)
पद्म पुराणात पुंडरिकाची जी कथा आली आहे त्या कथेत पुंडरिकाने विष्णूला बसायला दिलेल्या आसनासाठी "विष्टिर" हा शब्द वापरलेला आहे. (विष्टिरे तं निवेशितमं | २१५.२१)
विष्टि चा अर्थ सांगताना कॉ. शरद पाटील यांनी म्हटलेले आहे:-
विष्टिचा अर्थ सामंत प्रथाकाळात वेठबिगार असा होऊ लागला तरी अर्थशास्त्राने त्याचा मूळ अर्थ जतन केलेला आहे. विष्टी म्हणजे दासश्रम.
डॉ. पी. ए. गवळी यांनी देखील बेगार पर्शियन शब्द किंवा वेठ (संस्कृत विष्टी चे रूपांतर) यांनी मिळून वेठबिगारी ही संकल्पना तयार झालेली आहे असे म्हटलेलं आहे.
विष्टिच नारकीय जीवन यातना, तीव्र वेदना, पीडा, बाधा, व्यथा, कष्ट, प्रसूती वेदना, इ. दुखानी भरल्याचे अमरकोष म्हणतो (४६५-४६७)
वि. का. राजवाडे यांनी केलेली विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती व त्याचा दिलेला अर्थ ( दूर रानावनातील जागा म्हणजे गावाबाहेरील जागा असेही आपण म्हणू शकतो) शरद पाटील यांनी विष्टी चा दिलेला अर्थ अमरकोष मधील विष्टी बद्दल माहिती यामुळे विठ्ठलाचा संबंध अंत्यजांशी असावा असे वाटते.
वेठबिगारीच्या तापदायक रुढीमुळे कित्येक अस्पृश्याना गाव सोडून जावे लागे (प्रस्तावना - गंगाधर पानतावणे , पेशवेकालिन गुलामी व अस्पृश्यता)
बेगार म्हटले की महार पाहिजेच. तो नसेल तर बायको ती नसेल तर म्हातारा म्हातारी लहान मुलं रात्री-बेरात्री परंतु हजर पाहिजेच.
अर्थशास्रानुसार (२:३१) खालील व्यक्तीची विष्टी वा वेठबिगार बनते.
मार्जक - झाडूवाला
आरक्षक - पहारेकरी
धारक - वजन करणारा
मापक - मापाडी ( चर्मकार ?)
......
......
यातील महार म्हणजे जे आरक्षक म्हणून होते व त्या क्षेत्रात त्यांची पदोन्नती होऊन आरक्षकांचा प्रमुख (नायक) महाआरक्षक = महारक्षक = महार म्हणवला गेला. पुढे हीच पदवी प्राप्त करणार्याची जात बनलेली आपणास दिसते.
पंढरपुरात मिळालेल्या प्राचीन लेखाचा डॉ. श. गो. तुळपुळे यांनी दिलेला मतितार्थ असा :-
"श्री. शालिवाहन सौर शके १११ या वर्ष सौम्य संवत्सरी, शुक्रवार दिनी समस्त चक्रवर्ती (भिल्लम यादव राज्य करीत असताना) महाजन देव परिवार, मुद्रहस्त विठठ्ल देव नायक या सर्वानी (हे) लहान असे देऊळ (स्थापिलें)"
हा लेख पंढरपुरात मिळाला आहे. त्या काळी पंढरपुरात दुसरी सुद्धा मंदिर असू शकतात. त्यामुळे त्या लेखात जे विठ्ठल देव नायक म्हणून जे नाव आहे ते विठ्ठल मंदिराचा निर्देश करण्याच्या हेतूनं दिलेलं आहे अर्थात ते नाव विठ्ठलाचे असावे असे वाटते. आणि नसले तरी त्याच्या पुढच्या वंशजाचे असावे.
महारांच्या मागे लागणारा नाक हा शब्द नायक (नाईक) शब्दाचा अपभ्रंश असावा असे कित्येक विद्वानांच मत आहे.
तर काहींच्या मते नाग या शब्दाचा अपभ्रंश नाक आहे
महाभारताच्या शांतीपर्वात (१०९-९) अंत्यजांचा उल्लेख सैनिक असे करण्यात आला आहे.
कोरेगाव युद्धात महारानी जो पराक्रम गाजवला त्यातील काही नावे पुढील प्रमाणे :-
१ सोमनाक कमळनाक नाईक
२ रायनाक येसनाक नाईक
३ ......
४......
जोहार हा एक प्रभावशाली शब्द आज महारातच आहे. व तो त्यांच्या पुरातन महार संस्कृतीशी निगडीत आहे.
जोहार हा महारात अभिवादन करण्याचा प्रकार आहे. हा त्या जातिशिवाय इतर दुसर्या कोणत्याच जातीत आढळून येत नाही.
ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत जोहाराचा वापर सर्वांनी केला.
संत एकनाथांची जोहार कविता प्रसिद्ध आहे.
ज्ञानेश्वरांनी जोहार रूपक प्रसिद्ध केलं आहे.
तुकाराम महाराजानी जोहार लिहिले आहे.
या संतांपैकी कुणीही महार नसताना त्यांना जोहार आपलासा करावा का वाटल असेल बरे ?
ब्राह्मण तो नव्हे, सत्य त्याचे वेळे घडीला व्यभिचार । मातेशी व्यवहार अंत्यजाचा ।।
ता. १५ मे २००३ रात्री गोपाळ कृष्ण नावाच्या ब्राह्मणाने पंढरपूरला तीर्थ कुंडात लघवी केली.
(पकडला गेल्यावर त्याने आमची हीच परंपरा आहे असे सांगितले असे वाचनात आले परंतु या गोष्टीला माझ्याकडे भक्कम पुरावा नाही.)
प्रेत बाहेर घालिजे । का अंत्यजू संभाषण त्याजिजे । हे असो हाते क्षाळिजे । कश्मळाते ।
प्रेताला स्पर्श करू नये , परंतु त्यास बाहेर काढण्याकरिता जसा स्पर्श करावा लागतो; अथवा अंत्यजाशी बोलू नये परंतु अंत्यजाचा त्याग करण्याकरिता ' दूर हो ' म्हणून बोलावे लागते. विष्ठेला हात लावू नये परंतु शौचाचे वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे.
ज्ञानेश्वरांसारख्या संताने अस्पृश्यांचा उल्लेख शौचाशी , विष्ठेशी केला आहे हे ध्यानी धरावे.
ब्राह्मणांचे तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया ।
विठ्ठलाचा बाट काढन्याची परंपरा सुद्धा पंढरपूर ला आहे
या परंपरांचा अर्थ विठ्ठल खरोखरच अंत्यज होता. त्याची कीर्ती संपवता आली नाही म्हणून त्याच मूळ रूप बदलून आपल्या ताब्यात घेऊन त्याला अश्याप्रकारे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.
देहास विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ।
पंढरपूर लक्ष्मी तिर्थाजवळ दिंडीर वन नावाचे ठिकाण आहे. या दिंडीरवनाच्या अवती भोवतीअस्पृश्यांची वस्ती आहे. या वस्तीजवळ लखूबाई नावाच्या देवीचे ठिकाण असून हि लखूबाई म्हणजेच कृष्णावर रुसून आलेली रुक्मिणी असे म्हणतात.
(रा.चि. ढेरे - विठ्ठल एक महासमन्वय)
1835 साली भारत सरकारने जी अस्पृश्य समाजाची यादी तयार केलि होती. त्या यादिमध्ये मुंबई प्रांतात आढळणारी विठोलिया नावाची एक अस्पृश्य जात आहे
अश्या प्रकारे अंत्यजांचा संबंध विठ्ठलाशी येतो.
महाड जवळची पांडव लेणी त्या लेण्यांवर ताबा महारांचाच होता. प्रतिवर्षी कोजागिरी पौर्णिमेला किती तरी महार स्त्री पुरुष लेण्यांवर जातात , खातात ,पितात, नाचतात रात्रभर मुक्काम करतात
(महाडचा मुक्तिसंग्राम - प्रा. राम बिवलकर)
वेरुळला असलेल्या बौद्ध लेण्यांना धेड लेणी किंवा महार लेणी म्हटले जाते. धेड हा शब्द थेर (थेरिगाथा) ह्या बौद्ध शब्दापासून बनलेला आहे
कान्हेरी लेण्यातील शिलालेखात नकनाक , अपरनाक, धमनाक , गोलनाक , व मित नाक यांचा उल्लेख आहे
कार्ले लेण्यातील शिलालेखात महारठी अगिमितनाक , मित्तदेवनाक , उसभनाक यांचा उल्लेख आहे.
महारठीय हे शब्द त्यांचं महार पद दर्शवणारे असावे. परंतु त्याचा संबंध काही अभ्यासक मराठा या जातीशी जोडतात.
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या अस्पृश्य मूळचे कोण ? या ग्रंथात अस्पृश्य (अंत्यज) हे ब्रोकन मॅन लोक होते व ते बौद्ध धर्मी होते हे साधार सिद्ध केलेले आहे.
बौद्ध धर्मात महायान पंथाच्या निर्मितीनंतर बोधिसत्वांना फार महत्व प्राप्त झाले. हे बोधीसत्व समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून निर्माण झाले होते.
नागार्जुनाला महायान पंथीयांचा मानसपिता, महायान विचारसरणीचा जनक मानले जाते. चीन, जपान, तिबेट मधील बौद्ध त्यांना द्वितीय बौद्धच मानतात.
असंग व वसुबंधु इ.स.४ थ्या शतकात, दिन्नाग ५ व्या शतकात, धर्मकीर्ती ७ व्या शतकात होऊन गेलेले महान बौद्ध विचारवंत होते. ८ व्या शतकात होऊन गेलेले आचार्य पद्मसंभव यांनाही बुद्ध मानले गेले.
असाच मल्लांमध्ये होऊन गेलेला एक बोधिसत्व होता. त्यालाही बुद्धच मानलं गेलं. त्याच खर नाव जरी आपल्यासमोर नसले तरी तो आता पांडुरंग-विठ्ठल या नावाने ओळखला जातो.
विठ्ठल अंत्यजांमधील महायानी बौद्ध श्रमण (बोधिसत्व) होता. म्हणून विठ्ठल हे नाव त्याच अंत्यज रूप दर्शवितं तर पांडुरंग हे नाव त्याच बौद्ध रूप.
संदर्भ :-
१ पंढरीचा पांडुरंग बोधिसत्व होता - डॉ. जावळे बी. जी.
२ विठ्ठलाचा नवा शोध - संजय सोनवणी
३ जगन्नाथ पुरी हे प्राचीन बौद्ध क्षेत्र - बबन लव्हात्रे
४ मासिक - मार्च/एप्रिल २०१३ - भारतीय जनता - संत साहित्य आणि डॉ. आंबेडकर - प्रा. अरुण कांबळे
५ आद्य शंकराचार्य जीवन आणि विचार - तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी
६ हिंदुत्वाचे कोडे - डॉ. आंबेडकर
७ दास शुद्रांची गुलामगिरी खंड १: भाग १ - कॉ. शरद पाटील
८ पेशवेकालीन गुलामी व अस्पृश्यता - डॉ. पी. ए. गवळी
९ अस्पृश्य मूळचे कोण ? - डॉ. आंबेडकर
१० महार एक शूर जात - शी. भा. गायसमुद्रे
११ महार कोण होते ? - संजय सोनवणी
१२ महाराष्ट्राचा महार - वि. तू. जाधव
१३ हिंदू विरुद्ध वैदिक - पार्थ पोळके
१४ हिंदी संस्कृती आणि अहिंसा - धर्मानंद कोसंबी
१५ महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचा इतिहास - मां. शं. मोरे
१६ श्री. विठ्ठल : एक महासमन्वय - रां. ची. ढेरे
१७ दक्षिणेचा लोकदेव श्री. खंडोबा - रां. ची. ढेरे
(विशेष टीप :- या लेखाचा उद्देश बौद्ध अनुयायांना विठठलाचा भक्त बनवणे हा नसून बौद्धांच्या विरूद्ध जी प्रतीक्रान्ती घडवली गेली. जिच्यात अनेक बौद्ध विहारांचे मंदिरात रूपांतर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल मंदिराच सत्य शोधनाचा हा प्रयत्न होता)
'सद्धर्म पुंडरिक' हा महायान पंथाचा प्रमुख ग्रंथ आहे.
इंडियन अँटिक्वेरी (भाग दहावा) मध्येही पंढरपूर हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते आता हिंदूंचे झाले असा उल्लेख आहे.
( श्री विठ्ठल आणि पंढरपूर, लेखक - ग. ह. खरे, पृ. १४९)
बौद्धपूर्व या ग्रंथाचे लेखक श्री. वा. गो. आपटे यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. (पृ. १६७)
वारकरी पंथाचा भगवा झेंडा जो मराठा राज्याने स्वीकारला तो बुद्धाचाच होय. भगवा रंग हा भिक्षुचा वस्त्राचा रंग आहे. भगवान हे बुद्धाचेच नाव आहे.
(पुराणकथा आणि वास्तवता, लेखक दामोदर धर्मानंद कोसंबी, पृ. ४१)
अशोकाने बुद्धाची ८४ हजार देवळे बांधली त्यापैकी हे एक मंदिर असावे. सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या memoior of the cave temple या ग्रंथात मंदिर बौद्ध असल्याचे म्हटले आहे.
(धर्मपद, अ. रा. कुलकर्णी, या ग्रंथाचे परिशिष्ट पहा)
या मान्यवरांच्या मतानुसार विठ्ठल हा बौद्ध धर्माशी संबंधीत असावा हि खात्री पटते.
संतांनी सुद्धा विठ्ठलाला बौद्धरूपात पाहिलेलं आहे :-
होऊनिया कृष्ण कंस वधियेला ।
आता बुद्ध झाला सखा माझा ।।- संत जनाबाई
(३४४)
बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून ।
पुंडलिक दिवटा पाहून । तयाचे द्वारी गोंधळ मांडीला ।।बया दार लाव ।। बौद्धाई बया दार लाव ।।- संत एकनाथ
(३९११)
गोकुळी अवतारु सोळा सहस्त्रांवरू ।
आपण योगेश्वरु बौद्धरूपी ।।
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
झाला दिगंबर अवनिये ।।- संत नामदेव
(१०९६)
बौद्ध अवतार माझिया अद्रुष्टा । मौन्य मुखे निष्ठा धरीयेली - संत तुकाराम
मध्ये झाले मौन देव निजध्यानी । बौद्ध ते म्हणोनी नावेरूप - संत नामदेव
(२१०५)
अश्या प्रकारे संतानी विठ्ठलाला मौनी बुद्ध म्हणून पाहिलेलं आहे हे आपल्या समोर आहे.
आता आपण विठ्ठल संबंधाने काही भौतिक पुरावे व काही चालीरीती पाहू.
१ पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.
२ जुन्या काळी दशावताराची चित्रं छापताना नवव्या अवताराच्या ठिकाणी बुद्धा ऐवजी विठ्ठलाचे चित्र असे डॉ. रा चि. ढेरे यांनी नोंदवून ठेवले आहे.
३ दरवर्षी आषाढ पौर्णिमेला पंढरपूरची महायात्रा भरते. या पौर्णिमेला बौद्ध वाङमयात फार महत्वाचे स्थान आहे.
४ वारकरी ( मूळ शब्द वारीकरी) या संप्रदायात प्रवेश करते वेळी शपथ घ्यावी लागते. ही शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील होय.
५ चातुर्मासात वारी हि हिंदू संस्कृती प्रमाणे अयोग्य होय.
६ विठ्ठल पीतांबर धारी आहे. पीतांबर म्हणजे चिवर. बुद्ध जसे चीवर धारण करतात तेच चिवर विठ्ठलाला नेसवतात ज्याला पीतांबर म्हणतात.
७ पंढरपूरच्या वारीला निदान पंढरपूर पुरता तरी स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून सर्व एकत्र गोळा होतात.
८ बहिनाबाईंनी संत तुकाराम महाराज व विठ्ठलाच्या प्रेरणेतूनच बौद्ध महाकवी अश्वघोषाच्या वज्रसूची या चातुर्वर्ण्यविरोधी ग्रंथाचा मराठी अनुवाद केला.
या परंपरामधून व भौतिक पुराव्यातूनही विठ्ठल बौद्ध धर्माशी संबंधित असावा असा निष्कर्ष निघतो
विदा ज्ञानेन ठान शुन्यान लाति ग्रुव्हतिच स्वायम ।
तस्मात विठ्ठल म नामत्व, ध्यायस्व मुनिश्वर ।।
विठ्ठल हा शून्य तत्वज्ञान ग्रहण करून आपल्या ज्ञानाने इतरांच अज्ञान दूर करणारा आहे
शून्य तत्वज्ञान हे महायान पंथाचा प्रवर्तक नागार्जुनाने बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद यालाच पर्याय समजून घेतले आहे.
तोचि बौद्धरूपे जाण । पुढा धरिल दृढ मौन ।
तेव्हा कर्माकर्म विवंचना । सर्वथा जाण कळेना ।
तो तटस्थपणे सदा । प्रवर्तील महावादा ।
इतर दृष्टीकोनातून विठ्ठलाचे स्वरूप थोडक्यात पाहूया.
काही मान्यवरांनी विठ्ठल प्रमुख देव नसून पुंडरीकच (शिव)प्रमुख दैवत असून विठ्ठल हा शिवभक्त आहे असे म्हटलेले आहे.
पुंडरिक हा शिव आहे. हे कळावं म्हणून त्यांनी काही घटक आपणासमोर ठेवलेली आहेत.
१ पुंडरिक मंदिरात भव्य शिवलिंग आहे. पुंडरिकाची कसलीही मूर्ती नाही.
२ पुंडरिक मंदिरा बाहेर आता विस्थापित असला तरीही एक नंदी आहे.
३ पुंडरिक लिंगाची पूजा शिवाप्रमाणे बेल फुल वाहून होते.
४ महाशिवरात्रीस येथे माघ वद्य दशमी पासून पाच दिवस उत्सव होतो.
(विठ्ठलाचा नवा शोध - संजय सोनवणी)
हे पुरावे पुंडरिक शिव होता. यासाठी प्रबळ आहेत. परंतु विठ्ठलाच काय ?
तो हि शिवभक्तच होता काय ?
लगेचच असा निष्कर्ष काढन चुकीचं होईल. इतिहास काय सांगतो ते आधी आपण पाहूया
आद्य शंकराचार्यानी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भेट दिली होती असा उल्लेख 'चिदविलासयती' च्या शंकरविजयात आहे.
आचार्य दर्शनाला गेले आणि त्यांच्या तोंडून उदगार निघाले:-
महायोगपीठे तटे भिमरथ्या वरं पुंडरिका दातृ मुनींद्रे: ।
समात्याग तिष्ठता मानंदकंद परब्रह्म लिंग भजे पांडुरंगम ।।
शंकराचार्य यांचा इतिहास आपण पाहिला तर बौद्ध धर्माच्या विरूद्ध त्यांनी आपल तत्वज्ञान निर्माण केलं व बौद्धांच्या विरोधात जीवन वाहून घेतलं होत.
जगन्नाथ पुरी च्या संदर्भात माहिती देताना एल. एम. जोशी म्हणतात :-
आद्य शंकराचार्य द्वारे स्थापित केंद्रांपैकी एक ओरिसातील पुरी येथे होते.स्वामी विवेकानंद जे शंकर संप्रदायाचे अर्वाचीन काळातील प्रमुख शिक्षक आहेत त्याच्या अनुसार ' जगन्नाथाचे मंदिर एक जुने बौद्ध मंदिर आहे , त्याला आणि तशाच काही अन्य मंदिरांना आम्ही घेऊन त्यांना हिंदू मंदिर बनवून टाकले. पुढे सुद्धा आम्हाला अशा प्रकारची अनेक कामे करावयाची आहेत. ( श्री. एल. एम. जोशी पृ. ५१ - १९७७)
बदरीनाथ बद्दल श्री. दवे आणि एल. एम. जोशी यांच्या ग्रंथाचा दाखला देत डॉ. के. जमनादास यांनी आपल्या ग्रंथात नमूद केले आहे की परंपरेनुसार इ.स. ८-९ व्या शतकात आदय शंकराचार्याद्वारे बद्रीनारायनाच्या मंदिराचे निर्माण झाले. त्यांनी नारद कुंडात खोल डुबकी मारून तेथून हरवलेली मूर्ती काढून स्थापित केली. व इथे चार प्रमुख मठापैकी एकाची स्थापना केली.ज्याला उत्तरान्मय ज्योतिर्मठ म्हटल्या जाते.
या विषयी लालमणी जोशी आवर्जून सांगतात की ही मूर्ती बुद्धाची आहे
" बौद्धाची अन्य अनेक मंदिर ज्यांनी हिंदूंनी घेतली. त्यामध्ये उल्लेखनीय आहे गढवाल येथील बद्रीनाथाच मंदिर तेथे आज सुद्धा पूर्वीचीच आद्य बुद्धमूर्ती आपल्या स्थानी स्थित आहे आणि विष्णू म्हणून पूजल्या जात आहे. (श्री. एल. एम. जोशी, पृ. ५१ : १९७७)
सारनाथ स्तूपाजवळ आजही त्याची मान्यता आहे की स्तूपाचं शिवलिंग करण्याचं काम शंकराचार्यानी केलं.
(हिंदी संस्कृती आणि अहिंसा - कोसंबी)
बौद्धांच्या मुरत्यांची नासधूस करून त्याला शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला.
(देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे - प्रबोधनकार ठाकरे)
बुद्धाच्या विहाराशेजारीच ब्राह्मणांनी आपली विहारे बांधण्यास सुरवात केली......परकीय आक्रमणामुळे बुद्धभिक्खू देश सोडून गेले. त्यांच्या गैरहजेरीत ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा समूळ लोप करण्याच्या उद्देशाने बुध्द विहाराना पांडव लेणी म्हणू लागले. व बुद्धाच्या मूर्ती फोडून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू लागले.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-२०, पृ.३३४)
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आधी बौद्ध धर्माचे व नंतर शैव धर्माचे ठाणे होते
(कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे)
पुष्यमित्र शुंगाने कपटाने बृहद्रथाचा खून केला. सत्ता हस्तगत केल्यानंतर त्याने बौद्ध भिक्खुंचा छळ केला, हत्या केल्या.
बुद्धगया हे हे बौद्ध धर्मियांचे एक अत्यंत पवित्र स्थान आहे. त्याला बौद्धांची काशी म्हणतात. येथे बुद्धाची एक भली जंगी मूर्ती होती. ती काढून पुष्यामित्राने तिच्या जागी शिवाची मूर्ती स्थापन केली. (अशोक चरित्र - वा. गो. आपटे)
अशी इतिहासातील अनेक उदाहरणे आपणाला देता येतील.
रा.ची.ढेरे आपल्या विठ्ठल : एक महासमन्वय या ग्रंथात म्हणतात :-
"विठ्ठलाच्या उन्नयन प्रक्रियेत प्रथम शैवीकरणाची अवस्था सर्वत्र येते आणि नंतरच वैष्णविकरणाची अवस्था येते. असे सिद्ध होऊ शकत नाही.हि उन्नयन प्रक्रिया एकरेशीय नाही. तर बहुरेशिय आहे. उन्नयन प्रक्रियेत सापडलेल्या विठ्ठल-बिराप्पाच्या प्रत्येक ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारे उन्नयन घडत राहिले आहे. हे सत्य केवळ विठ्ठल बिराप्पापुरतेच मर्यादित नाही, तर मुरुगन -अय्यपन -अय्यनार यांसारख्या दक्षिणेतील लोकदेवांच्या ठाण्यात अथवा लज्जागौरीसारख्या आदिम मातृदेवीच्या ठाण्यातही आपणास उन्नयनप्रक्रिये संबंधीच्या या सत्याचा स्पष्ट प्रत्येय घेता येतो"
माणिकराव धनपलवार म्हणतात:-
"विठ्ठलाचे जसे वैष्णवीकरण घडले तसे त्याचे शैविकरण हि घडले होते; शैविकरणाची प्रक्रिया हि वैष्णविकरणाच्या पूर्वी पार पडली होती."
रा.ची ढेरे यांच्या मते विठ्ठल व त्यासारख्या इतर दैवतांचे शैवीकरण व वैष्णवीकरन झालेले आहे पण नेमकं आधी काय झालं व नंतर काय झालं हे सांगता येत नाही. व माणिकराव धनपलवार यांच्या मते विठ्ठलाचे वैष्णवीकरणाआगोदर शैवीकरन झालेलं आहे.
बौद्ध विहाराच्या जागा (आर्य)हिंदूंनी बळकावल्या. व त्याचे हिंदू मंदिरात रूपांतर केलं गेलं. (उदा: लेण्याद्री) आजही हि क्रिया थांबलेली नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो संख्येनं हिंदू भाविक बौद्ध लेण्यातील चैत्य स्तूपाना शिवलिंग म्हणून पुजताना दिसतील. काही ठिकाणी तर नारळ फोडून चैत्य स्तूपाना नुकसान पोहचवण्याच काम हि भाविक मंडळी करताना दिसतात. अश्या प्रकारे आजही बौद्ध लेण्यांचे हिंदुकरण करण्यात येत आहे.
पण सध्या जागरूक असणाऱ्या काही बौद्ध अनुयायांमुळे हे प्रमाण कमी होताना दिसत आहे.
जगन्नाथ हे बौद्ध मंदिर होते हे अनेक विद्वानांनी सिद्ध केले आहे. जगन्नाथाला मौनी बुद्ध मानण्याची परंपरा आहे तसेच विठ्ठलाला देखील मौनी बुद्ध मानण्याची परंपरा आहे.
स्कंद पुराणात पुंडरिकाशी संबंधित कथा आलेली असून त्याचा संबंध जगन्नाथ पुरीशी आलेला आहे.
पुंडरिकाचा उल्लेख आगोदरच्या साहित्यात फार कमी वेळा उल्लेखलेला आहे.
पांडुरंग व पुंडरिक हे नावदेखील एकसारखंच ( पुंडरीक च पांडुरंग झालेलं आहे ) आहे.
पुंडरीक दुसर तिसरं काही नसून शिवलिंग आहे. हे पण आपण पाहिलं.
याचा अर्थ मूळ विठ्ठलाची कीर्ती कमी करण्याच्या हेतूने विठ्ठलाच्या नावेच तिथे शिवलिंग मुख्य देव म्हणून उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला ?
श्री. म. माटे हे आपल्या 'पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रूपांतर' या लेखात काय म्हणतात ते पाहूया.
" दुसरी गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. पुंडलिकाच्या देवळात पुंडलिकाची मूर्ती नाही. तेथे शिवाचे लिंग आहे; आणि लिंगावर पुजारी लोक पितळेचा मुखवटा घालतात. जर ती पांडुरंगाची समाधी आहे, तर पद्धती प्रमाणे पादुका बसवावयास हव्या होत्या. आणि त्या बसवलेल्या असत्या, म्हणजे पुजार्यानी पितळेचा मुखवटा बसवला असता असे वाटत नाही. तथापी समाधीवर महादेवाचे लिंग बसवण्याची चालही आहे. आणि पुंडलिकाची समाधी ज्यांनी बांधली, त्यांनी कल्पनेप्रमाणे शिवलिंगाची स्थापना केली असेल. पण या ठिकाणी एक विकल्प मनात येतो. या पुंडलिकाच्या देवळातले पुजारी कोळी आहेत. अनेक ठिकाणी महादेवाची पुजा कोळ्यांकडेच असते. पूजेचा पहिला मान कोळ्यांकडे किंवा जंगमांकडे असून त्यांच्यामागून ब्राह्मणांनी पूजा करावी अशी चाल असते पण हि चाल एखाद्या समाधीवर बसवलेल्या शिवलिंगाच्या बाबतीत नसावी, असे मला वाटते. मग येथे पुंडलिकाची समाधी आहे, आणि हे मूळचेच महादेवाचे स्थान नाही तर येथली पूजा कोळ्यांकडे कशी, या प्रश्नाचाहि शोध करावा लागेल"
येथे श्री. म. माटे यांच्या मते पुंडरीक मंदिरात शिवलिंग आहे. त्याला पितळी मुखवटा बसवलेला आहे. ते शिव मंदिर असण्याचीही शक्यता आहे. पण त्याच बरोबर ती समाधी असण्याची शक्यता दर्शवून समाधीवर लिंग उभारण्याची प्रथा आहे असेही ते सांगतात. पण त्यांच्या मनात एक शंका आहे ती म्हणजे अन्य महादेव मंदिरात प्रथम पुजेचा मान कोळी किंवा जंगम यांना असतो नंतर ब्राहमण पुजारी तेथे पूजा करतो. मग पुंडरीक मंदिरातील पुजारी कोळी कसे हा त्यांचा प्रश्न आहे.
याच उत्तर त्यांनी पुंडलिक लिंगा ऐवजी आगोदर तेथे पुंडलिकाची मूर्ती असावी व नंतर तेथे लिंगाची स्थापना केली असावी असे मत त्यांनी मांडलेलं आहे
रा.ची ढेरे यांनी मात्र त्यांच पहिले मत उद्धृक्त करून पुंडरीक हा लिंग स्वरूपातील शिव आहे असे मानतात.
त्याला कारण म्हणजे त्यांच्याही मनात तोच प्रश्न आहे पुंडरीक मंदिरातील पूजारी कोळी कसे ?
आणि हा प्रश्न स्वाभाविक आहे. त्याच उत्तर असे कि पुंडरीक हा स्वतः कोळी समाजातील प्रसिद्ध व्यक्ती होती. याचे दाखले लीळाचरित्र व धनगरी कथेत आलेले आहेत. लिलाचरित्रात स्पष्टपणे विठठलाचा आणि कोळी समाजातील एका व्यक्तीचा संबंध आलेला असून धनगरी साहित्यातील म्हालिंगराय ह्या विठ्ठल भक्तांचा संबंध असून कोळी समाजातील व्यक्तीच समजली जाते.
अस जर असेल तर पुंडरिकाची पूजा कोळी लोकांनी करणं स्वाभाविकच आहे. पुंडरीक ज्याला म्हटलं जात तो कोळी समाजातील विठ्ठलाचा परम भक्त आहे. त्याच्या मृत्यूनंतर आदिम पद्धतीप्रमाणे त्यावर लिंग उभारणं हे हि स्वाभाविकच आहे ( लिंगपूजेचा संबंध प्रथम शिवपूजेशी नव्हता नंतर तो जोडण्यात आला हे वेगळ्या लेखात सविस्तर लिहीन)
लीळाचरित्र व श्री.म. माटे यांनी 'पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रूपांतर' हा लेख वाचल्यावर हे कळेल कि आज जो पुंडरीक म्हणून ओळखला जातो ती एका कोळी समाजातील व्यक्तीची समाधी आहे. लिळाचारित्रात विठठलाबरोबर त्या कोळी व्यक्तीचा देखील संदर्भ आलेला आहे. आदिम समाजात समाधीवर पिंड उभारण्याची प्रथा असून ती प्रथा काही समाजात आजही टिकून आहे. त्याचप्रकारे ती बांधलेली असून त्याचे पुजारी कोळी आहेत. या समाधीचा आणि विठ्ठलाचा संबंध नंतर जोडला गेलेला आहे ? कि खरच तो विठ्ठल भक्त आहे ?
तो भक्तच आहे व ती समाधीच आहे अशी संत परंपरा मानते व ते योग्य आहे. पण शैविकरण करताना पुंडरिकाला शिव बनवण्याचा प्रयत्न झाला. जसा मल्लीकार्जुन या जवळच्याच स्थानाचा झाला. बारा जोतिर्लिंगातील मल्लिकार्जुन हा मल्लाचं मूळ होय असे श्री. चांदोरकरांनी म्हटलेलं आहे.
मल्लीकार्जुन या नावात अर्जुन असणं आणि विठ्ठलाला कृष्ण म्हणन हि गोष्ट या दोघांना गुरू शिष्य असल्याचे तर निदर्शक नाही ना ?
इटल-ब्रमल या जोडदेवांपैकी विठ्ठल हा इटल आहे. तर ब्रमल हा विरमल्ल आहे असे रा.ची. ढेरे म्हणतात
त्याच बरोबर ते असेही म्हणतात कि इटल हा कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत विरमल्ल असतोच असतो. पण पंढरीतला विरमल्ल कोण हे ते सांगत नाहीत.
तो विरमल्ल मल्लिकार्जुनच आहे. त्याचेही आधी शैवीकरण करून त्याला शिव बनवले गेले.
या मल्लिकार्जुनालाच मल्लिनाथ म्हटलं गेलेलं आहे. खंडोबाला देखील मल्लिनाथ म्हटलं गेलेलं आहे. कदाचित खंडोबा देखील विरमल्ल तर नाही ?
विरमल्ला ला अर्जुन म्हणणं हे तो राजा असण्याशी संबंधित असून विठ्ठलाला कृष्ण म्हणनं हे त्याच्या गुरुत्वा कडे निर्देश करणारे आहे.
विठ्ठलाला लीळाचरित्र व अन्य पुराण कथा ब्राह्मण म्हणतात. श्रमणांना ब्राह्मण बनवण्याची परंपरा वैदिकांमध्ये पूर्वीपासूनच आहे. विठ्ठल हा श्रमण असण्याची शक्यताच अधिक आहे.
पुंडरीकमल्लिकार्जुनाच्या अग्र दर्शनाचा मान असण्याचं कारण हे दोनीही भक्त विठ्ठलाशी संबंधित लोकप्रिय भक्त होते.
रखुमाईची मूर्ती विठ्ठलापेक्षा दूर अंतरावर आहे हेही विठ्ठल श्रमण असण्याचं निदर्शक आहे. रखुमाई हि काल्पनिक आहे असं माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. धनगरी गीतात रखुमाईचा मृत्यू झाल्याचे वर्णन आहे. अस जर असेल तर विठ्ठलाने सन्यास घेऊन श्रमण बनला असण्याचीही शक्यता आहे. आणि म्हणून विठठलाबरोबर राखुमाईची मूर्ती अंतरावर ठेवण हे त्यावेळी लोकांना योग्य वाटलं असावं. विठठलाला लिळाचरित्राने व अन्य पुराण कथानी ब्राह्मण का म्हटले असेल त्याचा अर्थ असा आहे.
विठ्ठलाचा काळ :-
श्री.रघुनाथ भास्कर गोडबोले हे 'भरतखंडाचा अर्वाचीन कोश' या ग्रंथात लिहितात
" पुंडरीक हा जातीचा ब्राह्मण होता व मोठा विद्वानही असे. जैन लोक असे म्हणतात कि युधिष्ठिर शक १७२४ मध्ये विद्यारत्नाकर नावाच्या एका जैन पंडिताशी याचा वाद होऊन याचा पराभव झाला. व हा जैन धर्म स्वीकारून अहिंसा धर्माप्रमाणे आचरण करू लागला. हा वाद भिमारथीच्या तीरी म्हणजे भीमा नदीच्या काठी असणाऱ्या लोहदंड क्षेत्रात झाला. व त्यावेळी चंद्रगुप्तांचा मुलगा व अशोक राजाचा बाप वारीसार याची राज्यकीर्ती होती"
जैन लोक मल्लिकार्जुन व खंडोबाला मल्लिनाथ म्हणून ओळखतात. खरंतर जैनांच्या मल्लिनाथचा काळ व विठोबा आणि खंडोबाचा काळ यात फार तफावत आहे. फक्त नाम साधरम्यामुळेच ते खंडोबाला किंवा मल्लिकार्जुनाला जैनांचा मल्लिनाथ मानतात. मल्लिकार्जुन व खंडोबा हे मल्लिनाथ आहेत पण जैन लोक जो मल्लिनाथ मानतात तो मल्लिनाथ हे नाहीत.
श्री. गोडबोले यांच्या मतानुसार युधिष्ठाराचा राज्याभिषेक होऊन १७२४ वर्षांनी हि घटना घडलेली आहे.
श्री. काणे आणि श्री. अय्यर यांच्या मते महाभारताचा काळ इ.स.पु. १२०० हा आहे. मग हि तारीख खरी असेल तर पुंडरिकाचा काळ इ.स ५०० ठरतो. चंद्रगुप्त व अशोक हे मौर्य काळातील चंद्रगुप्त अशोक नसून गुप्त काळातील चंद्रगुप्त व अशोक आहेत (चंद्रगुप्त चा मुलगा समुद्रगुप्त हा स्वतःला अशोक म्हणवून घेत होता अस काही अभ्यासकांच मत आहे. ह्या काळातील मल्ल लोकांचा इतिहास शोधला तर सर्व माहिती मिळण्याची शक्यता आहे)
श्री. त्र्यं. गं. धनेश्वर यांनी 'वेरूळची लेणी' या पुस्तकात खंडेराव हि इ.स. ६२० मध्ये होऊन गेलेली एक बौद्ध विरोधक एक ऐतिहासिक व्यक्ती असावी असे म्हटलेले आहे.
श्री धनेश्वर यांच्या मतानुसार खंडोबाचा काळ इ.स. ६२० मानला आहे. जवळ-जवळ तोच काळ पुंडरिकाचा आहे हे श्री गोडबोले यांच्या दाखल्यावरून दिसून येते. धनेश्वरांनी खंडोबाला बौद्ध विरोधक व्यक्ती मानलेली आहे. खरंतर मिळणार्या पुराव्या वरून नेमकी परिस्थिती याच्या उलट दिसतेय.
विरमल्ल हा जर खंडोबा आहे व विरमल्लाचा आणि विठ्ठलाचा संबंध आहे. तर खंडोबा हा बौद्ध विरोधक व्यक्ती न ठरता बौद्ध समर्थकच ठरण्याची शक्यता आहे. जसा अशोक धनगर होता व बौद्ध होता. सातवाहनांना देखील काही लोक धनगर मानतात तेही बौद्ध धर्माबद्दल आदर दाखवत होते हे त्यांच्या काळातील बुद्ध लेण्यांवरून दिसून येईल तसेच धनगरांचा खंडोबा हा बौद्ध व्यक्ती नसली तरी बौद्ध विरोधक आहे याला कोणताही आधार दिसत नाही किंबहुना वरील विवेचनावरून ती बौद्ध समर्थक असावी अशीच शक्यता अधिक दिसते.
तिरुपती बालाजी हा विठोबाचं आहे. त्याच्याही परंपरा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. त्याला तिरुमल्ल म्हटलं जातं
पुराणात पांडुरंग माहात्म्य या नावाखाली वेगवेगळया कथा पसरवून सुरुवातीला इतर देवतांना पांडुरंग बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तोही फसला.
विठ्ठलाची कीर्ती ढळत नाही म्हटल्यावर विठ्ठलाच मूळ स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात विठ्ठलाच कृष्णकरण कऱण्यात आले व शिवाचा भक्त दाखवण्याचा प्रयत्न झाला.
कृष्ण भक्त असणारे महानुभाव यांच्या पवित्र ग्रंथात लिळाचारित्रात विठ्ठलाचे तुच्छतापूर्वक वर्णन आहे.
रामायणात राम भक्ताने बुद्धाला चोर म्हटले तश्याच प्रकारे लिळाचरित्रात कृष्ण भक्ताने विठ्ठलाला चोर म्हटले आहे.
स्कंद पांडुरंग महातम्यातील वर्णनानुसार
१ श्री. विठ्ठल बालाकृष्ण आहे.
२ श्री. विठ्ठलाच्या हृदयावर षडाक्षरी मंत्र कोरला आहे ( यांच्या कूट मंत्राचा अनुवाद रा. चि. ढेरे यांनी श्री.कृष्णाय नमः असा केला आहे)
३ श्री. विठ्ठलाच्या कपाळावर तृतीय नेत्र आहे
अशी लक्षणे असलेली मूर्ती माढे येथे स्थापित करण्यात आली. (पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर अशी कोणतीच लक्षण नाहीत) परंतु तिला पंढरपूर येथील विठ्ठला एवढ महत्व आलं नाही.
...सर्व आदित्यांमध्ये मी विष्णू आहे....मी रुद्रामध्ये शंकर आहे...(भगवदगीता)
सौप्तीक पर्वात महादेव अश्वत्थामा याला म्हणतात - कृष्णाने माझी पूजा केली. कृष्णाचा कार्योत्सव मोठा आहे. सत्य युद्धता प्रामाणिकपणा सहनशीलता चातुर्य स्वयंनियंत्रण हे श्री कृष्णाचे गुण आहेत. आता मला श्री कृष्णाहून प्रिय कोणी नाही.
उपन्याया कडून कृष्णाने शैव पंथाची दीक्षा घेतली
उपन्याया ब्राह्मणाने आठव्या दिवशी मला शास्त्रानुसार दीक्षा दिली. मी शीर्ष मुंडन केले. धृतमर्दन केले, हाती दंड घेऊन कुशमर्द घेऊन वल्कले धारण केली. कटीमेखला होतीच त्याने प्रायश्चित घेतले. मग त्याला महादेवाचे दर्शन घडले.
अनुशासन पर्वातील उतारा :-
पितामह ब्रह्मा पेक्षा हरी हा उच्च आहे. तो शाश्वत पुरुष आहे. तोच कृष्ण. सुवर्णकांती असलेला , मेघहीन आकाशात उगवलेला सूर्य , दश शस्त्रधारी , बलशाली , देवांच्या शत्रू चे नीरदालन करणारा , श्री वत्स लांछन असलेला तोच हा हृषीकेश देवाणीही ज्याची स्तुती करावी असा हा त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला मी ( शिव ) त्याच्या मास्तकातून निर्माण झालो.......
(हिंदुत्वाचे कोडे - डॉ. आंबेडकर)
अश्या प्रकारे कृष्ण शिवही आहे व विष्णूही. तो शिवभक्तं हि आहे. आणि शिवही त्याचा भक्त आहे.
शास्त्राचा आधार आधीच होता कींवा निर्माण केला गेला. याचा उपयोग विठ्ठलाला कृष्ण करण्यात व पुंडरीक लिंगाला तेथे स्थापना करण्यास हातभार लागला.
या सर्व गोष्टी करून सुद्धा विठ्ठलाच लोकांमधील स्थान त्यांना हलवता आलं नाही. त्याच स्थान तेच राहील जे आधी होत. त्याच्या स्वरूपा मध्ये बदल करण्यात मात्र (आर्य) हिंदू धर्मीय यशस्वी ठरले.
अतिवादी नव्हे शुद्ध या बिजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ।।
लेखाच्या सुरुवातीलाच विठ्ठल नावाची व्युत्पत्ती बघत असताना वि. का. राजवाडे यांनी दिलेली व्युत्पत्ती विठ्ठल नावाच्या सर्वात जवळ जाणारी आहे हे आधीच सांगितलेलं आहे.
पुन्हा एकदा त्यांनी दिलेली व्युत्पत्ती आपण पाहूया.
त्यांनी विठ्ठल हा विष्ठल म्हणजे दूर रानावनातील जागा यातून निष्पादावा असे म्हटलेलं आहे.
विष्टि + ठल (पाली शब्द) = विष्ठल (विठ्ठल)
पद्म पुराणात पुंडरिकाची जी कथा आली आहे त्या कथेत पुंडरिकाने विष्णूला बसायला दिलेल्या आसनासाठी "विष्टिर" हा शब्द वापरलेला आहे. (विष्टिरे तं निवेशितमं | २१५.२१)
विष्टि चा अर्थ सांगताना कॉ. शरद पाटील यांनी म्हटलेले आहे:-
विष्टिचा अर्थ सामंत प्रथाकाळात वेठबिगार असा होऊ लागला तरी अर्थशास्त्राने त्याचा मूळ अर्थ जतन केलेला आहे. विष्टी म्हणजे दासश्रम.
डॉ. पी. ए. गवळी यांनी देखील बेगार पर्शियन शब्द किंवा वेठ (संस्कृत विष्टी चे रूपांतर) यांनी मिळून वेठबिगारी ही संकल्पना तयार झालेली आहे असे म्हटलेलं आहे.
विष्टिच नारकीय जीवन यातना, तीव्र वेदना, पीडा, बाधा, व्यथा, कष्ट, प्रसूती वेदना, इ. दुखानी भरल्याचे अमरकोष म्हणतो (४६५-४६७)
वि. का. राजवाडे यांनी केलेली विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती व त्याचा दिलेला अर्थ ( दूर रानावनातील जागा म्हणजे गावाबाहेरील जागा असेही आपण म्हणू शकतो) शरद पाटील यांनी विष्टी चा दिलेला अर्थ अमरकोष मधील विष्टी बद्दल माहिती यामुळे विठ्ठलाचा संबंध अंत्यजांशी असावा असे वाटते.
वेठबिगारीच्या तापदायक रुढीमुळे कित्येक अस्पृश्याना गाव सोडून जावे लागे (प्रस्तावना - गंगाधर पानतावणे , पेशवेकालिन गुलामी व अस्पृश्यता)
बेगार म्हटले की महार पाहिजेच. तो नसेल तर बायको ती नसेल तर म्हातारा म्हातारी लहान मुलं रात्री-बेरात्री परंतु हजर पाहिजेच.
अर्थशास्रानुसार (२:३१) खालील व्यक्तीची विष्टी वा वेठबिगार बनते.
मार्जक - झाडूवाला
आरक्षक - पहारेकरी
धारक - वजन करणारा
मापक - मापाडी ( चर्मकार ?)
......
......
यातील महार म्हणजे जे आरक्षक म्हणून होते व त्या क्षेत्रात त्यांची पदोन्नती होऊन आरक्षकांचा प्रमुख (नायक) महाआरक्षक = महारक्षक = महार म्हणवला गेला. पुढे हीच पदवी प्राप्त करणार्याची जात बनलेली आपणास दिसते.
पंढरपुरात मिळालेल्या प्राचीन लेखाचा डॉ. श. गो. तुळपुळे यांनी दिलेला मतितार्थ असा :-
"श्री. शालिवाहन सौर शके १११ या वर्ष सौम्य संवत्सरी, शुक्रवार दिनी समस्त चक्रवर्ती (भिल्लम यादव राज्य करीत असताना) महाजन देव परिवार, मुद्रहस्त विठठ्ल देव नायक या सर्वानी (हे) लहान असे देऊळ (स्थापिलें)"
हा लेख पंढरपुरात मिळाला आहे. त्या काळी पंढरपुरात दुसरी सुद्धा मंदिर असू शकतात. त्यामुळे त्या लेखात जे विठ्ठल देव नायक म्हणून जे नाव आहे ते विठ्ठल मंदिराचा निर्देश करण्याच्या हेतूनं दिलेलं आहे अर्थात ते नाव विठ्ठलाचे असावे असे वाटते. आणि नसले तरी त्याच्या पुढच्या वंशजाचे असावे.
महारांच्या मागे लागणारा नाक हा शब्द नायक (नाईक) शब्दाचा अपभ्रंश असावा असे कित्येक विद्वानांच मत आहे.
तर काहींच्या मते नाग या शब्दाचा अपभ्रंश नाक आहे
महाभारताच्या शांतीपर्वात (१०९-९) अंत्यजांचा उल्लेख सैनिक असे करण्यात आला आहे.
कोरेगाव युद्धात महारानी जो पराक्रम गाजवला त्यातील काही नावे पुढील प्रमाणे :-
१ सोमनाक कमळनाक नाईक
२ रायनाक येसनाक नाईक
३ ......
४......
जोहार हा एक प्रभावशाली शब्द आज महारातच आहे. व तो त्यांच्या पुरातन महार संस्कृतीशी निगडीत आहे.
जोहार हा महारात अभिवादन करण्याचा प्रकार आहे. हा त्या जातिशिवाय इतर दुसर्या कोणत्याच जातीत आढळून येत नाही.
ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत जोहाराचा वापर सर्वांनी केला.
संत एकनाथांची जोहार कविता प्रसिद्ध आहे.
ज्ञानेश्वरांनी जोहार रूपक प्रसिद्ध केलं आहे.
तुकाराम महाराजानी जोहार लिहिले आहे.
या संतांपैकी कुणीही महार नसताना त्यांना जोहार आपलासा करावा का वाटल असेल बरे ?
ब्राह्मण तो नव्हे, सत्य त्याचे वेळे घडीला व्यभिचार । मातेशी व्यवहार अंत्यजाचा ।।
ता. १५ मे २००३ रात्री गोपाळ कृष्ण नावाच्या ब्राह्मणाने पंढरपूरला तीर्थ कुंडात लघवी केली.
(पकडला गेल्यावर त्याने आमची हीच परंपरा आहे असे सांगितले असे वाचनात आले परंतु या गोष्टीला माझ्याकडे भक्कम पुरावा नाही.)
प्रेत बाहेर घालिजे । का अंत्यजू संभाषण त्याजिजे । हे असो हाते क्षाळिजे । कश्मळाते ।
प्रेताला स्पर्श करू नये , परंतु त्यास बाहेर काढण्याकरिता जसा स्पर्श करावा लागतो; अथवा अंत्यजाशी बोलू नये परंतु अंत्यजाचा त्याग करण्याकरिता ' दूर हो ' म्हणून बोलावे लागते. विष्ठेला हात लावू नये परंतु शौचाचे वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे.
ज्ञानेश्वरांसारख्या संताने अस्पृश्यांचा उल्लेख शौचाशी , विष्ठेशी केला आहे हे ध्यानी धरावे.
ब्राह्मणांचे तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया ।
विठ्ठलाचा बाट काढन्याची परंपरा सुद्धा पंढरपूर ला आहे
या परंपरांचा अर्थ विठ्ठल खरोखरच अंत्यज होता. त्याची कीर्ती संपवता आली नाही म्हणून त्याच मूळ रूप बदलून आपल्या ताब्यात घेऊन त्याला अश्याप्रकारे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.
देहास विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ।
पंढरपूर लक्ष्मी तिर्थाजवळ दिंडीर वन नावाचे ठिकाण आहे. या दिंडीरवनाच्या अवती भोवतीअस्पृश्यांची वस्ती आहे. या वस्तीजवळ लखूबाई नावाच्या देवीचे ठिकाण असून हि लखूबाई म्हणजेच कृष्णावर रुसून आलेली रुक्मिणी असे म्हणतात.
(रा.चि. ढेरे - विठ्ठल एक महासमन्वय)
1835 साली भारत सरकारने जी अस्पृश्य समाजाची यादी तयार केलि होती. त्या यादिमध्ये मुंबई प्रांतात आढळणारी विठोलिया नावाची एक अस्पृश्य जात आहे
अश्या प्रकारे अंत्यजांचा संबंध विठ्ठलाशी येतो.
महाड जवळची पांडव लेणी त्या लेण्यांवर ताबा महारांचाच होता. प्रतिवर्षी कोजागिरी पौर्णिमेला किती तरी महार स्त्री पुरुष लेण्यांवर जातात , खातात ,पितात, नाचतात रात्रभर मुक्काम करतात
(महाडचा मुक्तिसंग्राम - प्रा. राम बिवलकर)
वेरुळला असलेल्या बौद्ध लेण्यांना धेड लेणी किंवा महार लेणी म्हटले जाते. धेड हा शब्द थेर (थेरिगाथा) ह्या बौद्ध शब्दापासून बनलेला आहे
कान्हेरी लेण्यातील शिलालेखात नकनाक , अपरनाक, धमनाक , गोलनाक , व मित नाक यांचा उल्लेख आहे
कार्ले लेण्यातील शिलालेखात महारठी अगिमितनाक , मित्तदेवनाक , उसभनाक यांचा उल्लेख आहे.
महारठीय हे शब्द त्यांचं महार पद दर्शवणारे असावे. परंतु त्याचा संबंध काही अभ्यासक मराठा या जातीशी जोडतात.
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या अस्पृश्य मूळचे कोण ? या ग्रंथात अस्पृश्य (अंत्यज) हे ब्रोकन मॅन लोक होते व ते बौद्ध धर्मी होते हे साधार सिद्ध केलेले आहे.
बौद्ध धर्मात महायान पंथाच्या निर्मितीनंतर बोधिसत्वांना फार महत्व प्राप्त झाले. हे बोधीसत्व समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून निर्माण झाले होते.
नागार्जुनाला महायान पंथीयांचा मानसपिता, महायान विचारसरणीचा जनक मानले जाते. चीन, जपान, तिबेट मधील बौद्ध त्यांना द्वितीय बौद्धच मानतात.
असंग व वसुबंधु इ.स.४ थ्या शतकात, दिन्नाग ५ व्या शतकात, धर्मकीर्ती ७ व्या शतकात होऊन गेलेले महान बौद्ध विचारवंत होते. ८ व्या शतकात होऊन गेलेले आचार्य पद्मसंभव यांनाही बुद्ध मानले गेले.
असाच मल्लांमध्ये होऊन गेलेला एक बोधिसत्व होता. त्यालाही बुद्धच मानलं गेलं. त्याच खर नाव जरी आपल्यासमोर नसले तरी तो आता पांडुरंग-विठ्ठल या नावाने ओळखला जातो.
विठ्ठल अंत्यजांमधील महायानी बौद्ध श्रमण (बोधिसत्व) होता. म्हणून विठ्ठल हे नाव त्याच अंत्यज रूप दर्शवितं तर पांडुरंग हे नाव त्याच बौद्ध रूप.
संदर्भ :-
१ पंढरीचा पांडुरंग बोधिसत्व होता - डॉ. जावळे बी. जी.
२ विठ्ठलाचा नवा शोध - संजय सोनवणी
३ जगन्नाथ पुरी हे प्राचीन बौद्ध क्षेत्र - बबन लव्हात्रे
४ मासिक - मार्च/एप्रिल २०१३ - भारतीय जनता - संत साहित्य आणि डॉ. आंबेडकर - प्रा. अरुण कांबळे
५ आद्य शंकराचार्य जीवन आणि विचार - तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी
६ हिंदुत्वाचे कोडे - डॉ. आंबेडकर
७ दास शुद्रांची गुलामगिरी खंड १: भाग १ - कॉ. शरद पाटील
८ पेशवेकालीन गुलामी व अस्पृश्यता - डॉ. पी. ए. गवळी
९ अस्पृश्य मूळचे कोण ? - डॉ. आंबेडकर
१० महार एक शूर जात - शी. भा. गायसमुद्रे
११ महार कोण होते ? - संजय सोनवणी
१२ महाराष्ट्राचा महार - वि. तू. जाधव
१३ हिंदू विरुद्ध वैदिक - पार्थ पोळके
१४ हिंदी संस्कृती आणि अहिंसा - धर्मानंद कोसंबी
१५ महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचा इतिहास - मां. शं. मोरे
१६ श्री. विठ्ठल : एक महासमन्वय - रां. ची. ढेरे
१७ दक्षिणेचा लोकदेव श्री. खंडोबा - रां. ची. ढेरे
(विशेष टीप :- या लेखाचा उद्देश बौद्ध अनुयायांना विठठलाचा भक्त बनवणे हा नसून बौद्धांच्या विरूद्ध जी प्रतीक्रान्ती घडवली गेली. जिच्यात अनेक बौद्ध विहारांचे मंदिरात रूपांतर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल मंदिराच सत्य शोधनाचा हा प्रयत्न होता)