मला एका मैत्रिणीने प्रश्न केला, 👇
बौध्द लोक पुजा करतात?
बुध्दांची मूर्ती किंवा फोटो ठे ऊन पुजा करतात, प्रार्थना बोलतात, अगरबत्ती लावतात, मेणबत्ती लावतात. आणि म्हणतात आम्ही देव मानित नाही. 👈
काय रे काय मत आहे तुझे ?
मी शांतपणे त्या मैत्रिणीला विचारले, तुझे वडिल गेल्या वर्षीच वारले ना? तर तू त्यांच्या फोटो समोर रोज अगरबत्ती लावताना काहि मागतेस का?
तर ती म्हणाली नाही. काही मागायला ते देव थोडी ना होते ? जन्मदाते आईवडील म्हणून त्यांची पुजा करतो आम्ही बहिणी आणि भाऊ.
मग मी बोललो आम्हीही बुध्द आणि बाबासाहेब आंबेडकरांना बाप म्हणूनच पुजतो, काही मागत नाही.
त्यांनी जन्म देणा-या आईबापांपेक्षाही महान उपकार केलेत. ते पण सगळया मानव जातीवर, त्या उपकारांची जाण म्हणून आम्ही त्यांचे स्मरण करतो.
त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो.
आम्ही हातजोडून प्रार्थना नाही करत, आम्ही वंदना वंदतो, वचन बध्द होतो. त्यांनी सांगितलेल्या तत्वांचं चिंतन मनन करतो.
पुन्हा पुन्हा स्वतःला बजावतो की मी असाच वागतोय ना ?
पंचशिल , ही प्रार्थना नाही तो शिलाचार आहे. माणूस बनण्याची गुरुकिल्ली आहे. तथागतांनी सांगितलेले पाच जगतश्रेष्ठ नियम आहेत.
आम्ही अगरबत्ती देवाला प्रसन्न करण्यासाठी लावीत नाही,
अगरबत्ती ज्याप्रमाणे स्वतः जळते आणि सुगंध देते ,त्याचप्रमाणे पंचशिलाच्या पालनाने आमच्या माणुसकीचाही सुगंध पसरावा.
या भावनेचे प्रतीक अगरबत्ती आह े.
आम्ही मेणबत्ती यासाठी लावतो की ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते कुठलेही नुकसान न करता नि:स्वार्थपणे.
तसेच आमचे जीवनही दुस-यांना जगण्यास सहाय्य व्हावे.
ज्ञानाचा प्रकाश आमच्या मार्फत इतरांना मिळावा. या हेतून मेणबत्ती आम्ही लावतो. आम्ही फुले देवाला प्रसन्न करण्यासाठी वाहत नाही. ज्या प्रमाणे फुले फुलते आणि आपल्या सौंदर्याने, सुगंधाने वातावरण प्रफुल्लीत करते आणि कालांतराने कोमेजून जाते तसेच मानवी जीवनही क्षणभंगुर असून नाशवंत आहे.
त्यामुळे आपले हे जीवनही मानवाला उपकारक होवो याचे भान म्हणून आम्ही पुजेत फुले वापरतो.
आम्ही बौध्द लोक बुध्द आणि बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे चालत आहोत.
आमचे जीवन या महान विचारांनी प्रकाशित झालेले आहे. आमचे जीवन सुवर्णमय झालेय ते केवळ बुध्द आणि आंबेडकरांच्या मार्गावर चालल्यामुळे.
आम्ही या महामानवांच्या मुर्त्या आणि फोटो मांडतो त्या केवळ आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढ्यांच्या मनात त्या कोरल्या जाव्यात म्हणून.
या महामानवांचे कर्तृत्व आणि उपकार काळाच्या पडद्याआड जाऊ नये म्हणून.
आम्ही बुध्दांचे आणि बाबासाहेबांचे प्रामाणिक अनुयायी आहोत पुजारी नाही.
आम्ही बुध्द , आणि आंबेडकरांना त्यांच्या विचारांसह प्रामाणिकपणे स्वीकारले आहे.
कारण आम्हाला त्यांनी अमाप दिलंय. मागण्याची आवश्यकताच उरली नाही.
आमची पुजा म्हणजे उपकाराची जाणीव.कृतज्ञतेचे निर्मळ भाव.
ना नवस, ना कसली हाव, ना म्हणत कुणी पाव, ना म्हणत बा संकट आलंय आता धाव, ना अंगारा ,ना धुपारा , ना गंडा ,ना दोरा , ना होम हवनातली होळी ,ना जीवांचे क्रुर बळी .
म्हणूनच नाही मानत आम्ही त्यांना देव*
ते आहेत आमचे वंदनीय महामानव.👏👏
👏 *नमो* *बुध्दाय* ........ *जयभीम* 👏
No comments:
Post a Comment